समाध्या, स्मारके, संग्रहालये या भारतीय भावविश्वाशी विपरीत गोष्टी आहेत. निरपवादपणे कोणतीही व्यक्ती भूत आणि भविष्यापासून वेगळी नसते. तिचा आविर्भाव भूतकाळाचा परिणाम असतो आणि त्याचा प्रवास मृत्यूशी संपत नाही. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करून पुढे जाणे ही भारतीय पद्धत आहे. त्यामुळे सगळ्या समाध्या, स्मारके, संग्रहालये मोडीत काढण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवा. अन यापुढे हे सारे होणार नाही असा विचार पसरायला हवा. याला कोणीही अपवाद नसावा. तत्त्व थोडे बाजूला ठेवले तरी एक गमतीचा पण गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे - असेच चालू राहिले तर, कोणाच्याही अनुयायांना राहायला देखील जागा उरणार नाही.
आजकाल राहुल गांधी सुद्धा भारतीयत्वाची चर्चा करतात. त्यांनी पुढाकार घेऊन तीन मूर्ती भवनापासून याबाबतीत पुढाकार घ्यावा.
- श्रीपाद कोठे
२७ ऑगस्ट २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा