सध्या अण्णा हजारे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे एका `हिंदू विश्वकोशा'च्या प्रकाशन कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून उपस्थित होते. नशीब त्यावरून गदारोळ झाला नाही. पण सहज एक आठवून गेले. दिल्लीतील त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी मंचावर स्वामी विवेकानंद, भारतमाता यांची छायाचित्रे होती. त्यावरून केवढा गदारोळ झाला होता. त्यामुळे नंतरच्या उपोषणामध्ये त्या चित्रांची सुट्टी झाली होती. आपल्या देशातील सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्वशक्तीमान प्रसार माध्यमे, अण्णांचे विरोधक आणि पाठीराखे या सगळ्यांनाच अमेरिकेतील हिंदुत्व चालते, पण भारतातील नको असे म्हणायचे का? बाकी असो काहीही, जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात.
- श्रीपाद कोठे
२९ ऑगस्ट २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा