रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

कशातच काही अर्थ नसतो...

`कशातच काही अर्थ नसतो मित्रा. मस्त बिनधास्त जगायचं. मटणमच्छी खायची. दारूबिरू प्यायची. बाई, बाटली सगळं करायचं. मनसोक्त शिव्याबिव्या द्यायच्या. कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही. आपल्याला वाटेल ते, आपल्याला वाटेल तसं, आपल्याला वाटेल तेव्हा वागायचं बोलायचं. मस्त रहने का... क्या??'

एक मित्र दुसऱ्या शामळू मित्राला शहाणं करत होता. शामळूच तो. त्याने सहज विचारलं- `कशातच काही अर्थ नसतो म्हणतो. मग मित्रा, तू आत्ता म्हणालास त्या सगळ्या गोष्टीत अर्थ असतो का? म्हणजे असेलच म्हणा. त्याशिवाय का तू करणार?'

`शहाणे करून सोडावे सकळ जन' असं व्रत घेतलेला, सल्ला देणारा मित्र, हातातला वेफर्सचा पुडा फेकून देऊन, गाडीला किक मारून हातवारे करत निघून गेला.

- श्रीपाद कोठे

२९ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा