बदाबदा पाऊस पडतो अन सगळीकडे पाणी साचतं. कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी नागपूर. फोटो, व्हिडीओ, चर्चा, आरोप प्रत्यारोप, गोंधळ गदारोळ, आरोप प्रत्यारोप यांची धांदल. सरकार, प्रशासन यावर प्रश्नचिन्ह. पण रस्ते व घरांच्या मधल्या मोकळ्या जागेत केलेले कॉंक्रिटीकरण, टाइल्सीकरण, गाड्या झुपकन आत नेता याव्या यासाठी फाटकांबाहेर तयार केलेले डोंगर, झाकून टाकलेले फुटपाथ इत्यादी काढून टाकण्याची, तोडून टाकण्याची, मोकळे करण्याची इच्छा/ तयारी/ हिम्मत/ आहे का? माणसाची, समाजाची, प्रशासनाची अन सरकारचीही? मुळात अवाढव्य शहरांचा मूर्खपणा टाकून देण्याची तयारी किती आहे?
- श्रीपाद कोठे
१४ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा