बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

असमाधानी

महात्मा गांधींच्या हत्येत रा. स्व. संघ सहभागी असल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांनी माफी मागितली होती. काल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तांत्रिक पद्धतीने पण एक प्रकारे माफीच मागितली. किमान गांधीजींच्या हत्येत संघ सहभागी नाही हे मान्य केले. तरीही कुत्र्याच्या शेपटासारखी वृत्ती असलेले लोक आहेतच. त्यातीलच एक म्हणजे गांधीजींचे पणतू तुषार गांधी. त्यांनी तर काल आयबीएन-७ (हिंदी) वर स्पष्ट आरोपच केला की गांधीजींच्या हत्येला संघ जबाबदार आहे. एकदा त्यांनाही न्यायालयात खेचावे कोणीतरी. किंवा सध्या सुरु असलेल्या खटल्यातच सहआरोपी करावे. वाटल्यास सुमार केतकर अन त्यांच्यासारख्या बाकीच्यांनाही विचारून घ्यावं- तुमचं समाधान झालंय का म्हणून. नाही तर त्यांनाही एकदाचं घोळात घेऊनच टाकावं.

- श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा