शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

ज्ञानेश्वर आणि लोकशाही

बरं झालं ज्ञानेश्वरांच्या काळात ही लोकशाही व्यवस्था नव्हती; नाही तर त्यांनाही लोकांनी विचारलं असत - तुम्ही कोणत्या पक्षाचे? आमच्या की त्यांच्या? काहींनी धमकी सुद्धा दिली असती कदाचित आम्ही म्हणतो ते आणि तसेच बोला. अनेकांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असता, हे सुल्तान वगैरे कसे वाईट आहेत. अन वर विश्वात्मक वगैरे लिहिण्या/ बोलण्यासाठी, आळंदीपासून तिंबकटु पर्यंतच्या माणसांसाठी लिहिण्याबद्दल, सगळ्यांवर प्रेम करण्याबद्दल; त्यांना जाबही विचारला असता.

बरं झालं वेद काळी आजची लोकशाही नव्हती. नाही तर सर्वेपि सुखीन: संतू लिहिणाऱ्याला जगूही दिलं नसतं लोकांनी.

कोण कुठले दीड शहाणे आले इथे शे दोनशे वर्षांपूर्वी अन सांगून गेले की, राजकारणाला पर्याय नाही. तुम्ही राजकारण करत नाही म्हणजे मूर्ख आहात. अन आम्ही इतके महान की, सगळं गुंडाळून एक राजकारण करणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानू लागलो. नो राजकारण म्हणणाऱ्यांसाठी कठीण काळ आहे.

- श्रीपाद कोठे

१३ ऑगस्ट २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा