सत्ता आल्यानंतर रा.स्व. संघाला तिरंग्याचं प्रेम आलं. तोवर त्याला तिरंग्याशी अन देशाशी देणंघेणं नव्हतं.
- परम आदरणीय राहुल गांधी आज कुठेतरी बोलले असं टीव्हीने दाखवलं.
यावर काय म्हणायचं, नाही म्हणायचं संघ ठरवेल. पण मला मात्र राहुल गांधींना एक म्हणायचं आहे-
१) `देर आए दुरुस्त आए' अशी एक हिंदी म्हण आहे ती शिकून घ्या.
२) संघाला सत्तेनंतर तरी देशाचं प्रेम आलं. तुम्हाला (म्हणजे राहुल ला आणि कॉंग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, अन त्याच माळेतले सगळे) मात्र भगवा ध्वज, शिवाजी महाराज, शीख पंथ, एवढेच काय गेल्या पाचदहा हजार वर्षातील भारत, भारतीयता, आध्यात्म, धर्म या सगळ्याचा द्वेष, द्वेष आणि द्वेषच वाटत आला आहे आणि अजूनही वाटतो. अन त्याचं कारण साधं सरळ आहे. तुम्ही कधीही भगवा फडकवलेला नाही. भगव्याला वंदन केलेले नाही.
- श्रीपाद कोठे
१७ ऑगस्ट २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा