शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

विकासासह विचार

पंडित दीनदयाळ उपाध्याय भारतीय जनसंघाचे महामंत्री होते. त्यांना एकदा एकाने विचारले- जनसंघ सत्तेवर आल्यानंतर जर सत्ताधारी चुकीचे वागले तर? क्षणाचाही विलंब न लावता पंडितजी म्हणाले- जनता आम्हाला पदच्युत करेल. तसे होऊ नये याची जबाबदारी आमची आहे.

आज कोणत्या राजकीय पक्षाच्या महामंत्र्याची एवढा खणखणीत विचार करण्याची ताकद आहे?

विकासासोबत विचार असेल तरच समाजाचं, देशाचं, जगाचं भलं होईल. विचारहीनता नेहमीच अधोगतीला नेते.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा