माझ्या काही पोस्ट वाचून एकाचा फोन आला. म्हणाला- तुम्ही राजकारणाला, सत्तेला एवढा विरोध का करता? भीष्म पितामहांनी देखील म्हटलंच आहे ना- `राजा कालस्य कारणम'. मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. कारण त्याला माझी भूमिका समजून घेण्यापेक्षा वाद घालण्यात रस होता. पण त्याला उत्तर दिले नाही तरी त्याच्या युक्तिवादावर माझी भूमिका नाही असे नाही. काय आहे माझे म्हणणे-
भीष्म पितामहांनी `राजा कालस्य कारणम' म्हटले हे खरे आहे. परंतु त्यात बदल होणारच नाही किंवा त्यात बदल करूच नये किंवा तेच योग्य आहे; असे तर नाही ना म्हटले. उलट श्रीकृष्णांपासून तर असंख्य संत, महंत, विचारक, त्यागी, बैरागी, कार्यकर्ते, चिंतक यांनी सत्तानिरपेक्ष समाज उभा करण्याचे प्रयत्न केलेत. दुर्दैवाने त्याला योग्य प्रतिसाद देण्याला आम्ही समाज म्हणून कमी पडलो. मानवाच्या मुलभूत दुर्बलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणे आम्हाला व्यक्ती आणि समाज या दोन्ही नात्यांनी नको वाटते. आमच्या या वाटण्यात बदल करणे योग्य वा आवश्यक आहे की नाही, याचा विचार सगळ्यांनी करावा.
- श्रीपाद कोठे
१७ ऑगस्ट २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा