आज बातम्यांमध्ये पाहिलं की, कोणा तरी भक्ताने महालक्ष्मी मांडताना त्यांना मास्क बांधले आणि कोरोना विषयक फलक त्यांच्या हातात दिले. हे काही योग्य वाटले नाही. ज्यांनी हे केले त्यांची भावना नक्कीच चांगली असणार. किंबहुना अशी कृती खूप चांगल्या भावनेतूनच होते. पण याला भावनातिरेक म्हणावे लागेल. दैवतांचे पावित्र्य, त्या प्रतिमेचे गांभीर्य, वातावरण सांभाळले पाहिजे. ते मोडू नये. एखादा देखावा, दैवत प्रतिमेच्या बाजूला संदेश फलक इत्यादी करायला हरकत नाही. पण देवप्रतिमा जशी असते तशीच ठेवणे रास्त वाटते.
- श्रीपाद कोठे
२६ ऑगस्ट २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा