ॐ नम: शिवाय.
वर्तमान जनरीतीनुसार श्रावण सोमवारनिमित्त प्रबोधनात्मक संदेश प्राप्त झाला-
शंकराला १०८ बिल्वपत्रे वाहून पर्यावरणाचे नुकसान करू नये. झाडे ओरबाडू नये. वगैरे.
असा संदेश पाठवण्यापेक्षा एक बेलाचे झाड लावले तरी ते किमान पाचपन्नास लोकांना श्रावण सोमवारी बेलपत्र पुरवेल आणि बाकीचे ११ महिने शुद्ध हवा, प्राणवायू, सावली इत्यादी आहेच.
आपापला दृष्टीकोन असे कोणी म्हणेल. पण झाड लावून पाने वाहणे हा नक्कीच सकारात्मक अन चांगला दृष्टीकोन आहे.
- श्रीपाद कोठे
८ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा