परवा विजयादशमीला सरसंघचालकांचे भाषण झाले. ते भाषण सुरु होते तेव्हापासूनच चर्चेला आणि प्रसार माध्यमांच्या मतप्रदर्शनाला सुरुवात झाली. ही चर्चा काही काळ चालेल. अनेक विषय होतेच. सुरक्षा, आजची परिस्थिती, रोहिंग्या, काश्मीर इत्यादी. हे सगळेच विषय महत्वाचे आहेतच. पण ते सगळे तातडीचे अन अल्पकाळाचे आहेत. एक विषय मात्र दीर्घ काळाचा, अधिक मुलभूत असा होता आणि स्वयंसेवकांच्या दृष्टीने मला तो जास्त महत्वाचा वाटतो. कारण अन्य विषय स्वरूप या दृष्टीनेही गुंतागुंतीचे आहेत. त्यात सामान्य व्यक्तीने प्रत्यक्षात करण्यासारखे खूप काही नाही. परंतु जो दीर्घकालीन विषय त्यांनी मांडला तो मात्र सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना त्यात काही ना काही करण्यासारखे आहे. तो विषय होता- `विश्वविभव की व्याख्या नयी करेंगे'. त्या कार्यक्रमात झालेल्या सांघिक गीतातील ही एक ओळ. ही उद्धृत करून सरसंघचालक त्यावर बोलले. याची मस्करी होऊ शकेल, यावर टीकाटिप्पणी होऊ शकेल, यावर कुचाळकी होऊ शकेल. परंतु वैभवाची नवीन व्याख्या जगात स्थापित करण्याची गरज आणि संकेत या भाषणात त्यांनी दिले. त्या दिशेने प्रयत्नशील होणे हा स्वयंसेवक आणि अन्य समाजासाठीही खरा संदेश आहे.
- श्रीपाद कोठे
२ ऑक्टोबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा