शबरीमला प्रकरणी पुनर्विचार याचिका करण्यात आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर होणाऱ्या चर्चेत अनेक विषय आणि पैलू येतात, पण व्रत आणि तप हे दोन पैलू येत नाहीत. रूढी, परंपरा, मान्यता, समज यापेक्षा व्रत आणि तप खूप वेगळे आहे. सामाजिक परिवर्तनाच्या भोंगळ झाडूने झाडणे थांबवले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ मंडळी सुद्धा अभारतीय विचारांची शिकार झालेली आहे. 'आदर्श समाज' 'समाज परिवर्तनाचे स्वप्न' इत्यादी भंपकपणा आहे. अनेक गोष्टींच्या मूळ धारणात भारत आणि अन्य जग यांच्यात खूप फरक आहे. समाज, देश, माणूस, माणूस व समाज यांचा संबंध, देशभक्ती, सामाजिकता अशा अनेक बाबतीतही हा फरक आहे. याविषयीच्या भारतीय धारणा केवळ भारतीय आहेत म्हणून स्वीकाराव्यात वा श्रेष्ठ आहेत असे नाही. पण भारतीय व अभारतीय धारणांची चिकित्सक मांडणी व्हायला हवी ती होत नाही. जवळजवळ १०० टक्के अभारतीय कल्पना, धारणा, समजुती घेऊनच आपण चालतो आहोत. शासन, प्रशासन, घटना, कायदे, न्यायव्यवस्था, jurisprudence, कल्पना, समजुती; या सगळ्या गृहित धरून चालण्यापेक्षा चिकित्सा करून मांडल्या जाव्यात.
- श्रीपाद कोठे
९ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा