रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

कोणीही कोणाचं नसतं

कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात एक वाक्य आहे - 'कोणीही कोणाचं नसतं.' खलील जिब्रानच्या प्रॉफेटच्या तोंडीही अशाच आशयाचं एक वाक्य आहे - 'तुमची मुलं तुमची नाहीत. तुमच्यातून आलेली आहेत.' आदि शंकराचार्य त्यांच्या निर्वाण षटकम स्तोत्रात हाच भाव व्यक्त करतात. परंतु तिघांच्याही प्रतिपादनात खूप मूलभूत फरक आहे. कुसुमाग्रज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं असलं पाहिजे. मानवी भावनांना अनुसरून व्यक्त केली गेलेली नटसम्राटाची निराशा ही अपेक्षा सुचवते. खलील जिब्रानचा प्रॉफेट जीवनाचं नागडं सत्य तत्वचिंतकाच्या अधिकाराने मानवाला समजावून सांगतो. आदि शंकराचार्य मानवी भावांच्या वर उठून, तत्वचिंतनाच्या सोपानावरून 'मी शिव आहे' हे अंतिम सत्य सांगतात. 'कोणीही कोणाचं नसतं' ही एकच गोष्ट कशी विविध रुपात असू शकते, तिचे अर्थ कसे वेगळाले असू शकतात हे यावरून समजून घेता येतं.

(आगामी लेखनातून)

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा