गमतीशीर होण्याला मर्यादाही नाही अन बंधनही नाही. राम मंदिरासाठी अध्यादेश आलाच तर तो शहाबानो अध्यादेशासारखा म्हणता येईल का? शहाबानो अध्यादेश लाखो मुस्लिम महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा होता. राम मंदिरावर अध्यादेश आला तर तो कोणत्याही समाजाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा नसणार. तो ५०० वर्षांचा संघर्ष आणि अन्याय दूर करणारा राहील. पण एवढा विचार करण्याचे अर्णवला काय कारण? त्याने गमतीशीर व्हायचे ठरवलेच आहे !!
- श्रीपाद कोठे
५ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा