पुन्हा एकदा सावरकर चर्चेत आले आहेत. गांधीहत्येत सहभागी असल्याने त्यांना भारतरत्न देऊ नये असाही एक आवाज आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, गांधी हत्येसाठी सावरकर वा संघ यांना दोषी ठरवणाऱ्यांचा पंडित नेहरूंवर तरी विश्वास आहे की नाही? बरं त्यांची सत्तागाठ पटेलांशी बांधली होती असं म्हटलं तरी १९५० नंतर ती सुटली आणि नंतर १४ वर्ष नेहरूंना कोणताही अडथळा नव्हता. तरीही गांधी हत्येच्या आरोपातून मुक्त झालेले सावरकर आणि संघ मोकळेच राहिले. ज्यांना सावरकर आणि संघ सलतात त्यांनी त्यासाठी पंडित नेहरूंना प्रश्न केले पाहिजेत.
- श्रीपाद कोठे
१८ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा