सुखाच्या आणि आनंदाच्याच नव्हे तर प्रतिष्ठेच्या, सन्मानाच्या, मानापमानाच्या कल्पना सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर बरावाईट प्रभाव टाकत असतात. पर्यावरण ही गोष्ट सुद्धा त्याला अपवाद नाही. या कल्पना बदलणं, गळी उतरवणं हे देखील मोठं आणि प्राधान्याचं काम आहे. यात महिलांचा सहभाग मोठा राहू शकतो एवढंच नाही तर त्याच हे काम खऱ्या अर्थाने करू शकतात. सध्या दुर्गेचा जागर सुरू आहे. सगळ्या दुर्गांनी कल्पना बदलण्याच्या कामाचा हा विडा उचलायला हरकत नाही. त्या उचलतील का ठाऊक नाही अपेक्षा मात्र आहे. (बाकी दुर्गा माझ्यावर कायमस्वरूपी नाराज असतात हा भाग वेगळा.) ☺
- श्रीपाद कोठे
५ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा