दोन प्रकारची माणसे आजूबाजूला पाहायला मिळतात. एक म्हणतात, आपण आपलं व्यवस्थापन नीट, चोख करावं. बाह्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये. दुसरे काही म्हणतात, बाहेरील परिस्थिती, वातावरण, साधने बदलली पाहिजेत. या दोन्ही गोष्टी सत्य अन आवश्यक नाहीत का? म्हणजे असं की, मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो, नीट खुराक घेतो, व्यायाम वगैरे करतो. पण मी राहतो त्या इमारतीच्या दारावर नेहमीच कचऱ्याचा ढीग असतो, गुरेढोरे फिरत असतात, माशा-किडे असतात. चालेल का? किंवा मी राहतो तो सगळा परिसर, ती इमारत, माझा निवास सगळे छान स्वच्छ, नीटनेटके, आरोग्यदायी. पण मी व्यायाम करत नाही, खाणेपिणे योग्य नाही, तब्येतीची काळजी घेत नाही. चालेल का? बाहेरील अन आतील दोन्ही आवश्यक नाही का? मला तरी तसे वाटते.
- श्रीपाद कोठे
८ ऑक्टोबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा