बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

कला क्षेत्राची तेरवी

विचार, तर्कशुद्धता, संवेदना, सामाजिक भान आणि जाण यांच्यापासून फारकत घेणारी कला, कलाकार, कलाविचार, कलाविश्लेषण, कलातत्वज्ञान यांची तेरवी जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगले. (नशा करून तमाशे करणाऱ्या सध्याच्या कलाकारांच्या उपद्व्यापांचा या मताला पूर्ण संदर्भ आहे.) एकेकाळी कम्युनिस्ट वगैरे समजले जाणारे कलाकार, गीतकार इत्यादी सुद्धा भारतीयता, मूल्य आदी गोष्टींना जपत असत. अरबी पेट्रो डॉलर्स बॉलीवूडला पोसू लागल्यापासून बॉलीवूडने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टीने फक्त नुकसान आणि नुकसानच केले आहे. हे बॉलीवूड जेवढ्या लवकर नामशेष होईल तेवढे चांगले. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून तुमच्या माझ्यापर्यंत सगळ्यांनी यासाठी आपापले प्रयत्न करावेत. ज्या तरुणाईचं सतत खूप कौतुक चालतं त्या तरुणाईनेही बॉलीवूडला आपल्या जीवनातून हद्दपार करावे. तरुणाईची नुसती झिंग असून चालणार नाही. तरुणाईने विचारीही व्हावे.

- श्रीपाद कोठे

५ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा