रामजन्मभूमीचा निकाल सगळ्यांनी खुल्या मनाने स्वीकारून सौहार्द कायम राखण्याचे आवाहन रा. स्व. संघाने केले आहे. हिंदू समाजासह सगळ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे; आपली भाषा, भाव, अभिव्यक्ती, आनंद अथवा निराशा संयमितपणे प्रकट व्हावी ही अपेक्षा त्यातून व्यक्त झाली आहे. संघासोबत अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी देखील अशी समंजस भूमिका समाजासमोर मांडून तसे आवाहन करायला हवे. त्याने एक सार्वत्रिक सौहार्दाचे वातावरण तयार होईल.
- श्रीपाद कोठे
३१ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा