वंश, वंशवाद, वांशिकता, वंशवर्चस्व, वंशशुद्धी, वंशसातत्य, वंशप्राचीनता; अशा विषयांची बरीच चर्चा वेळोवेळी होत असते. यात दोन प्रकार आहेत. एकात वंश शब्द 'घराणं' या अर्थाने वापरला जातो. दुसऱ्यात वंश शब्द 'मनुष्य समूह' या अर्थाने वापरला जातो. जसे आर्य, द्रविड, मंगोल इत्यादी. इंग्रजीत ज्याला race म्हणतात त्या अर्थाने. दोन्ही प्रकारच्या चर्चा एका मर्यादेतच relevant असतात. त्यात खूप तथ्य असतं असं नाही. तो वेगळा विषय पण एक प्रश्न मनात येतो. हे सगळे वंश कुठून आले असतील. सगळ्याच्या सगळ्या वंशाच्या आद्य जोड्या वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून तर पडल्या नसणारच. किंवा जमिनीतून उगवल्या नसणार. म्हणजेच काही ना काही सरमिसळ प्रक्रिया घडली असणारच. याचाच अर्थ वंशाचे मूळ गवसणे अशक्य. मग जिथे मूळच हाती नाही तिथे या चर्चांना काय अर्थ राहतो? ते सुद्धा मानवजात आद्य जोडीतून विकसित झाल्याचं गृहितक स्वीकारलं तरंच. मानवाची उत्पत्ती आद्य जोडीविना झाली असेल आणि जोडी ही नंतरच्या प्रक्रियेत विकसित झाली नसेल, हे तरी कशावरून?
- श्रीपाद कोठे
२६ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा