रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

प्रसार माध्यमांचा उपयोग

सकाळपासून दोन गोष्टी आठवत आहेत.

१) दोन दशकांपूर्वी लोकसत्ता दैनिकाने चालवलेली भ्रष्टाचाराविरुद्धची मालिका. काही महिने चाललेल्या या उपक्रमात रोज वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि दर रविवारी पहिल्या पानावर अग्रलेख. शीर्षक होतं - भ्रष्टाचाराचे भेद किती?

- भ्रष्टाचाराचं काय झालं?

२) तीन दशकांपूर्वी त्यावेळचे times of india चे संपादक गिरीलाल जैन यांनी लिहिलेले secularism चा समाचार घेणारे अनेक लेख. ते लेख इतके प्रभावी होते की, संघाच्या लोकांनी त्या लेखांची पुस्तिका काढली होती. गिरीलाल जैन हिंदुत्ववादी नव्हते हे विशेष.

- secularism वर अजूनही चर्चा सुरूच आहे.

***************

- 'प्रसार माध्यमे, चर्चा यांचा उपयोग आणि परिणाम' हेदेखील आपल्या समजून घेण्याचे विषय व्हायला हवेत. नाही का?

- समस्या सोडवायच्या असतात की चघळायच्या असतात? ठरवलं पाहिजे. नाही का?

- समस्या सोडवण्याच्या वेगळ्या प्रयत्नांचा, वेगळ्या पद्धतींचा विचार केला पाहिजे. नाही का?

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा