चालणं शिकण्यासाठी पांगुळगाडा हवाच. पण पांगुळगाडा दूर सारल्याशिवाय चालणं आणि धावणं शक्य होत नाही. दोन्ही योग्य. दोन्ही आवश्यक.
चालण्याचे हे नियम - विचार करणं, निर्णय घेणं, काम करणं, सामाजिक कार्य, एखाद्या विषयाचं अध्ययन, मनाचा आनंद, मनाचं रंजन, आध्यात्मिक साधना; या आणि यासारख्या जीवनातल्या बहुतेक गोष्टींना लागू होतात. पुस्तकं, मंदिरं, धर्मग्रंथ, विचारवंत, माणसं, साधनं, कृती; या सगळ्यांकडे याच पद्धतीने पाहावं लागतं. कर्ता, कर्म, क्रियापद टाकून देऊन सोलीव तत्वाचं आकलन करण्याचा प्रयत्न हवा. कोणतीही गोष्ट अनुभूत व्हायला हवी.
- श्रीपाद कोठे
१९ ऑक्टोबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा