अरे अर्णवा, ऋग्वेद वगैरे quote करताना थोडा विचार करून बोलत जा रे. हिंदूंनी मानवासमोर ठेवलेला आदर्श कायदा वा अन्य प्रकारे लादण्यासाठी नाही, लादणे हे हिंदू धर्माच्या घोरविरोधी आहे. तो आदर्श या पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, विकासावस्थेनुसार गाठण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. बंधनकारक नाही. त्यासाठीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हिंदू तत्व भारतबाह्य रीतीने समजून घेता येत नाहीत.
- श्रीपाद कोठे
२१ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा