महेश मांजरेकरच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा शिळ्या कढीला उत आलेला आहे. ज्यांना प्रामाणिकपणे विषय माहिती नसेल त्यांच्यासाठी - नथुराम गोडसे. चित्रपट २०२२ मध्ये सुरू होणार आहे म्हणजे २०२३ उजाडेल. तोवर तरी कढी उकळत राहील. सहज एक मनात आलं - गोडसेने माउंटबॅटनला का नाही मारलं? असे प्रश्न निरर्थक आहेत हे मला नीट कळतं. कारण अस्थिर मनाला अशी चिकित्सा लागू होत नाही. शिवाय आपला राग काय होता हे स्वतः गोडसेने सांगितलं असल्यामुळे त्यावर वाद घालण्यातही अर्थ नाही. एवढंच वाटतं की, गोडसेने फाळणी टाळण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. ते अधिक चांगलं झालं असतं. असो.
- यानिमित्ताने होणाऱ्या चर्चेत संघ गांधींचा विरोधक होता आणि मजबुरीने संघाला एकात्मता स्तोत्रात गांधींना स्थान द्यावे लागले, अशीही चर्चा होते. अशी चर्चा करणारे हिंदुत्वाचे समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंचे असतात. पण हे चुकीचे आहे हे सगळ्यांनी मोकळ्या मनाने नीट समजून घेतले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
४ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा