'वेदांत दर्शनास आत्यंतिक निराशावादाने प्रारंभ होतो व त्याची परिसमाप्ती खऱ्या आशावादात होते. आम्ही इंद्रियांवर आधारलेला आशावाद नाकारतो हे खरे. तथापि इंद्रियातीत अनुभवांवर आधारलेला खराखुरा आशावाद आम्ही प्रतिपादतो. आज जगात आढळणारा आशावाद आपल्याला इंद्रियांच्या योगे विनाशाप्रत खेचून नेईल.'
- स्वामी विवेकानंद
काही गोष्टींचा मुळातून विचार करायला हवा आहे. आशावाद ही पण त्यातली एक. त्यासाठी विवेकानंदांचे हे प्रतिपादन दिशादर्शक आहे. विवेकानंदांचे बहुसंख्य भक्त, अनुयायी किंवा त्यांना मानणारे सुद्धा; विवेकानंदांच्या विचारांच्या आधारे त्यांनी त्याज्य ठरवलेला आशावाद मांडण्याचा प्रयत्न करतात. असे पुष्कळ बाबतीत होते. त्यासाठी थोडे सूक्ष्म अध्ययन वाढीला लागायला हवे. दिसायला छोट्या पण परिणाम मोठ्या करणाऱ्या या बाबी असतात.
- श्रीपाद कोठे
३१ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा