वादाचे शमन प्रतिवादाने होत नाही. त्याने केवळ शक्तीचा, बुद्धीचा ऱ्हास होतो. वादाचे शमन विचाराने होते.
कट्टरतेचे शमन प्रति कट्टरतेने होत नाही. त्याने केवळ त्रास आणि वेदना वाढते. कट्टरतेचे शमन विवेकाने होते.
विचारांची आणि विवेकाची वाढ सांस्कृतिक उन्नतीने होते. त्यासाठी आतल्या माणसाला साद घालावी लागते. त्यालाच प्रेरणा जागवणे म्हणता येईल.
आधुनिक समाजव्यवस्था जीवनाच्या प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न करत नाही. जीवनाचा व्यवहार नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे समस्या चक्रवाढ गतीने वाढतात.
- श्रीपाद कोठे
२६ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा