आज सहज पाहिलं तर, विश्व हिंदू परिषदेने १९८० च्या दशकात काढलेल्या गंगाकलश यात्रेच्या वेळी घेतलेल्या गंगाजलाच्या बाटलीतील गंगाजल आजही स्वच्छ आहे. याचाच अर्थ किमान तोवर गंगा शुद्ध होती. तिच्या पाण्याची जादू कायम होती. सगळी घाण त्यानंतरची आहे.
जागतिकीकरणाचा परिणाम??
what next??
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
स्वामी सानंद गंगार्पित झाले. दु:ख स्वाभाविक आहे. पुढे-
- पाण्याची बाटली विकत घेणे बंद. घरून पाणी सोबत नेणे.
- कचरा कमी होण्यासाठी उपभोग आवश्यकतेच्या सीमेत आणणे.
- कचरा कमी होण्यासाठी आवरणाचा मोह सोडणे.
- सांडपाणी मातीत मुरेल याची काळजी घेणे.
- अधिकाधिक माती/ जमीन मोकळी राहील याचा प्रयत्न करणे.
- विजेचा गैरवापर थांबवणे.
- वस्तूंकडील धाव कमी करणे.
- मातीवर प्रेम करायला शिकणे.
- पंच महाभूतांवर वर्चस्व गाजवण्याचा हट्ट टाकून देऊन त्यांच्यावर प्रेम करायला शिकणे.
- `अं, काय होते? मी करून काय होईल?' याऐवजी विचार आणि कृती करण्याचा प्रयत्न करणे.
- माझी क्षमता, माझी परिस्थिती फुटभर माती मोकळी ठेवू शकत असेल तर तेवढी हिमतीने मोकळी ठेवणे.
- योग्य गोष्ट करताना निर्लज्ज होणे.
- प्रदूषण करणारे जे जे आहे ते कमी करणे आणि टाकून देणे. (धूम्रपान, प्रसाधने आदी)
असं काही केलं तर दु:खाला अर्थ राहील.
@@@@@@@@@@@@@@@@
- श्रीपाद कोठे
१२ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा