तीन चार वर्षांपूर्वीचा प्रसंग. एक महिला कार्यकर्त्या (स्वत: महिला आणि महिलांसाठी काम करणाऱ्या) एका प्रकरणाबद्दल सांगत होत्या. त्यांचं कथन झाल्यावर मी त्यांना विचारलं - नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्या घोटाळ्यात पडल्या. तेव्हा खुलासा करीत मी पुन्हा विचारलं- १) दोघात बेबनाव झाला आहे का? २) दोघांच्या wavelength जुळत नाहीत का? ३) अपेक्षापूर्ती न होण्याचा मामला आहे का? ४) तिसऱ्या कोणाची लुडबुड आहे का? ५) दुष्टपणा आहे का? यावर त्या नाराज झाल्या. म्हणाल्या- हा काय प्रश्न आहे? अन्याय म्हणजे अन्याय. न्याय मिळायलाच हवा. त्यावर मी म्हटले- दोघेही माणसे आहेत ना? त्या रागारागाने उठून निघून गेल्या.
आजच्या वातावरणात आणि चर्चेच्या महापुरात सहज स्मरण झालं.
- श्रीपाद कोठे
१३ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा