आज दोन बातम्या पाहिल्या. एका सरदारजीने आपली पगडी सोडून, तिच्या साहाय्याने बुडणाऱ्या युवकांचे प्राण वाचवले. दुसरी बातमी- एक बिबट्या पाणी प्यायला गेला अन पाणी पिता पिता त्याचा पूर्ण चेहरा स्टीलच्या घागरीत अडकला. मोठी जोखीम घेऊन, प्रयत्नपूर्वक लोकांनी त्याला वाचवले.
निव्वळ भौतिक, आर्थिक लाभहानीच्या पलीकडच्या प्रेरणाच माणसाला माणूस बनवतात. अन मुळात त्या असतातच. त्यांचं जागरण, त्यांची चर्चा, त्यांच्यासाठी पोषक वातावरण, त्यांच्या संवर्धनाची खटपट, त्यांची जोपासना, त्यांना प्राधान्य, त्यांना उचलून धरणे; यावर अधिक भर देण्याला पर्याय नाही. असंख्य अनावश्यक गोष्टी कमी करून त्या गोष्टींकडे लक्ष दिले तर आणि कदाचित तरच, भविष्य बरं राहील. हिशेब शिकवत राहणे अन हिशेब करत राहणे बिघाडच करत राहतील.
- श्रीपाद कोठे
३० सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा