सहज रिमोटची बटनं दाबत होतो. डीडी-भारती वाहिनी लागली. तिथे चक्क भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे तो राहू दिला. पूर्ण ऐकला. पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे गायन आणि राजेंद्र प्रसन्न यांचं बासरीवादन अशी जुगलबंदी सुरु होती. नव्हाळीचं म्हणून आणि गायन-वादन चांगलं होतं म्हणून ऐकत होतो, पण ऐकताना वारंवार मनात येत होतं- दुपारी एक वाजता राग ललित ऐकायचा म्हणजे थोडं जास्तंच, नाही का? राग ललित सकाळचा राग आहे. दुपारी मधुवंती, सारंग वगैरे लावावे; हे दूरदर्शनच्या लोकांना माहिती असणे कठीण आहे. शिवाय सकाळी शास्त्रीय संगीतासाठी वेळ आहे का? वगैरे तांत्रिक कारणेही असतीलच. एक मात्र खरं की, शास्त्रीय संगीताकडे होणारं दुर्लक्ष थोडं तरी कमी व्हायला हवं आणि संबंधित लोकांचं त्याबद्दलचं ज्ञान जरा वाढायला हवं.
- श्रीपाद कोठे
२७ सप्टेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा